सन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा ‘राष्ट्रीय उठाव’ म्हणून प्रसिध्द आहे. १८५७ साली झालेला उठाव हा इंग्रजांविरुध्द भारतात झालेला पहिला उठाव नव्हता, त्यापूर्वीही इंग्रजांविरुध्द अनेक उठाव झाले होते. त्यातील महत्वाचे उठाव खाली दिलेले आहेत.
ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव | ||
संन्याशाचा उठाव | 1765-1800 | बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक |
चुआरांचा उठाव | 1768 | बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला |
हो जमातीचे बंड | 1820 | छोटा नागपूर व सिंगभूम |
जमिनदारांचा उठाव | 1803 | ओडिशा जगबंधू |
खोंडांचा उठाव | 1836 | पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई |
संथाळांचा उठाव | 1855 | कान्हू व सिंधू |
खासींचा उठाव | 1824 | आसाम निरतसिंग |
कुंकिंचा उठाव | 1826 | मणिपूर दक्षिण भारतातील |
पाळेगारांचा उठाव | 1790 | मद्रास |
म्हैसूरमधील शेतकर्यांचा उठाव | 1830 | म्हैसूर |
विजयनगरचा उठाव | 1765 | विजयनगर |
गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव | 1870 | गोरखपूर |
रोहिलखंडातील उठाव | 1801 | रोहिलखंड |
रामोश्यांचा उठाव | 1826 | महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत |
भिल्ल व कोळ्यांचा उठाव | 1824 | महाराष्ट्र |
केतूरच्या देसाईचा उठाव | 1824 | केतूर |
भिल्लाचा उठाव | 1825 | खानदेश |
दख्खनचे दंगे | 1875 | पुणे, सातारा, महाराष्ट्र शेतकरी |